किती आले सोबत
गणित त्याचे मांडले नाही
साथ किती क्षणांची
किती जीव जडला
तुटला जीव म्हणून भांडले नाही
जपले स्वतःला
जपले साऱ्यांना
राख सजवली मनाची
रस्त्यात येऊन सांडले नाही
खपले किती वाण
मनात येऊन व्रण
बोलून व अबोलाचे
कळले तसे हे देखील वागणे चांगले नाही
विचारले पुन्हा पुन्हा
घडला काय गुन्हा
न मला उमजले
न तुला कळले
आता त्यावर बोलणे यात भले नाही
अमित जहागीरदार
१५ जून २०२२
No comments:
Post a Comment