न बंध आज मला न प्रश्न आज तुला
का विचारायचे मग झाल्यात का चुका ?
तुला कळलेच होते
जीव गुंतला तुझ्यात
श्वासात तू असते
मी जोवर हयात
प्रेम आहेस का ? मग तू विचारते पुन्हा
नको ते सांगणे
दुसऱ्याच्या कथा
मला कळल्या नाही
तुझ्या काही व्यथा
प्रेम का विसरते ? झालो का मी परका ?
बोलणे जाड गेले
तू किती प्रिय आहे
माझ्यापेक्षा मला
तू किती स्वीय आहे
प्रश्न येतोच का मग हा सारखा ?
का विचारायचे मग झाल्यात का चुका ?
अमित जहागीरदार
१० जून २०२२
अलिबाग
No comments:
Post a Comment