हल्ली कविता सुचत नाहीत
शब्दांना अर्थ महाग झालेत
भावनांचे आधुनिकीकरण
आणि विचारांचे प्रभाग झालेत
कुणाला सकारात्मक हवा असतो
आशयाचा द्रूष्टीकोन
कुणाला शब्दांचा श्रुंगार हवा
कुणा भावनांचे पूर्ण मौन
काल मधे जगलो तर
भुतकाळाचे फोफावते
आजच्या आशांचे दान
मग तो करुन जातो रिते ||
नव्या जोमाचा नवा काळ
नुसता समोरुन खुणावतो
कवेत त्याला घेता घेता
मी पुरता दमतो ||
विसाव्याला बसलो तर
पुन्हा प्रश्न तोच पडतो
शब्दांमागे धावतांना
अर्थाचा जीव जळतो ||
नकोच ते शब्द अन् ते नियम
श्वास त्यांनाही घेवू द्या
शोधत मला आता
चेहर्यांना काही येवू द्या ||
२२ फेब्रु २०१५
No comments:
Post a Comment